Wednesday, 25 February 2009

माझे आवडते मराठी गाणे.......रोज अनुभवायाचे....

उषःकाल होता होता, काळरात्र झाली 
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली...  
 
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी 
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी 
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....  
 
तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती 
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती 
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....  
 
उभा देश झाला आता एक बंदीशाला 
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला 
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....    
 
धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे 
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे 
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली....  

2 comments:

  1. maze pan avadte gane ahe. he gane ekale ki shahare yetat. ani rozchya aushyat apan manus ahot yachi janiv hote. khare pahata he gane roz anubhavale jate.

    ReplyDelete
  2. maze pan avadte gane ahe. he gane ekale ki shahare yetat ani apan manus manun jivant ahot yachi janiv hote. khare pahate he gane manje aple rojche jagne

    ReplyDelete